कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे गरजेचे

 कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे गरजेचे 

                                     - राहुल देशपांडे



डोंबिवली ( शंकर जाधव ) कोरोना महामारीमूळे सर्व क्षेत्र प्रभावित झाले आहेत. अर्थव्यवस्थेसह शैक्षणिक क्षेत्राचेही अतोनात नुकसान होत असून याचा फटका विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासावर याचा परिणाम होत आहे. मात्र येत्या काळात शाळा सुरू करताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे लागेल असे मत यूरो स्कूल इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देशपांडे यानी व्यक्त केले. यूरो स्कूलची नवीन १२  वी शाखा डोंबिवली येथील रुणवाल गार्डन परिसरात येथे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देताना ते बोलत होते. 

 

कोविड  १९ या संसर्गजन्य जागतिक महामारी गेल्या ८  महीने शाळा बंद आहेत. अनेक शाळा महाविद्यालये ऑनलाईन शिक्षणावर भर देत असले तरी व्यक्तिमत्व विकास साधायचा झाल्यास विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात सरळ संवाद होणे गरजेचे आहे अशी भावना आता विद्यार्थी आणि पालकांची होऊ लागली आहे.  याच पार्श्वभूमिवर कोरोना संसर्गला अटकाव करण्यासाठी विविध व आधुनिक साधन सामग्रीचा वापर करण्याकडे अनेक शाळांना कल असल्याचे दिसून येत आहे. असे सांगत देशपांडे म्हणाले की. यूरो स्कूल शाळेमध्ये विद्यार्थी सुरक्षित शिक्षण घेऊ शकेल अशी व्यवस्था करण्यात आली विद्यार्थ्यांना संसर्ग होणार नाही याची खबरदारी घेतली जाणार असल्याचेही देशपांडे यांनी सांगितले.  साथीची रोग येणारी परिस्थिती लक्षात घेऊन संपूर्ण शाळांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने पुरेशा उपाययोजना केल्या जातील यासाठी अथक प्रयत्न करीत आहेत. देशपांडे यांनी सांगितले की आम्ही एक बीव्हीक्यूआय प्रमाणित सुरक्षित शाळा आहोत आणि त्याव्यतिरिक्तकोवसेफ - एक ब्यूरो व्हेरिटास- कोव्ह सेफ हायजीन मॅनेजमेंट सिस्टम सर्टिफिकेशन पोस्ट रिझोम्प्शन लागू करणार आहोत जीसीओव्ही आयडीनंतरच्या परिस्थितीतील सर्व स्वच्छतेच्या जोखमीवर लक्ष दजास्तीत जास्त शैक्षणिक आणि विना-शैक्षणिक प्रदर्शनासाठी बॅलेन्स्ड स्कूलिंग’ या तत्त्वांवर आधारित अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे यामध्ये भारताचे पहिले प्रमाणित सेफ स्कूल नेटवर्क असल्याची प्रतिष्ठा आहे.  नवीन शैक्षणिक वर्षाची सुरूवात कदाचित शाळा सुरू होण्याच्या अगोदरच्या शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुसार संपूर्ण सावधगिरीच्या उपायांसह करेल. सुरक्षितता आणि सुरक्षेच्या संदर्भात जागतिक सर्वोत्तम पद्धतींचे पालन करण्यासाठी व्यवस्थापनाने सुरक्षित शाळा पुनरारंभ यासाठी नवनवीन धोरणे आखली जात असल्याचे सांगितले. त्यामुळे येत्या काळात विद्यार्थ्यांना सुराक्षेसह शिक्षण प्रणाली अमलात येत आल्याचे दिसून येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या