रेल्वे प्रशासन आणि सरकारचे डोळे आता उघडतील काय ?

 रेल्वे प्रशासनाच्या अंदाधुंदी गलथानपणामुळे,निष्काळजीपणामुळे निष्पाप लोकांचा बळी.




मी आज बोलतो आहे,ते सोमवार दिनांक ९ जून २०२५ रोजी मुंब्रा येथील घडलेल्या दुर्दैवी घटने बद्दल 

स्पेशल रिपोर्ट: लोकसत्यवाणी न्यूज
संपादक संतोष सावंत

रेल्वे प्रशासन आणि संबंधित सरकार यावर काही तोडगा काढणार की नाही? की फक्त निष्पाप लोकांच्या जीवाचा बळी घेत राहणार. नोकरी करणारे हे चाकरमानी जीव मुठीत घेऊन दरदिवशी प्रवास करत असतात. नेहमी गाड्या भरून जात असतात. पोटा पाण्यासाठी आज मुंबईत पुन्हा परकीय लोकांचा लोंढा वाढत आहे. कोरोनाच्या काळात काहींनी मुबई सोडून आपापल्या गावी गेले. काही कायमचे गावी स्थिरावन्यासाठी गेले ही असतील, पण त्या त्या राज्यात जर नोकरी धंदाच उपलब्ध नसेल तर  ते लोक पोट तरी कशी भरतील. मग शेवटी काय तर पुणे,मुंबई, ठाणे अशी शहरे त्यांना नोकरी धंदा करण्यासाठी ही अशी शहरे योग्य वाटू लागतात. म्हणून पुन्हा मुंबईची लोकसंख्या वाढली. पर्यायाने रेल्वेवर बोजा हा तर येणारच आहे. मग रेल्वे प्रशासनाने तसेच संबंधित सरकारने यावर ठोस पावले उचलायला नको का? आज सोमवार ९ जून रोजी सकाळी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामावर जाणाऱ्या     या ६ प्रवाशांचा नाहक जो बळी गेला, त्याला कारणीभुत कोण? कुटुंबातील जी माणसे बिचारी ज्याच्यावर अवलंबून होती. तोच त्यांच्या घरातील कर्ता माणूस आज नाहक बळी गेला. घरातील त्या प्रत्येक कुटुंबातील माणसांना त्यांच्या जीवाला आज काय वेदना झाल्या असतील. याचा कोणी विचार केला आहे का? काही लाख देऊनही त्यांच्या कुटुंबातील लोकांना काही दिवस शांत कराल. पण तो लाख मोलाचा गेलेला जीव त्यांचा तो माणूस कुटुंबातील सर्वांवर प्रेम करणारा तो त्यांना मिळेल का? 

मुंब्रा येथील वळणावरील दोन्ही गाड्यांमधील जे अंतर आहे, फारच कमी असल्याचे सांगीतले जाते. त्यात डब्यात तुटुंब गर्दी असल्याने प्रवासी गेटवर राहून प्रवास करत असतात. प्रवाशांची एकमेकांची बॅग घासलि आणि हात सुटून आठ जन गाडीतून खाली पडले. त्यात सहा जन मृत्यू  पावले. 



निष्पाप जे लोक मारले जात आहेत. त्यांचा वाली कोण? रेल्वे प्रशासन आणि सरकार यांनी मिळून तातडीने संपूर्ण रेल्वे ची देखभाल अथवा सुधारणा ह्या आता तरी करतील का? की निष्पाप लोकांचा आणखी बळी घेत राहणार! असे संतापजनक सूर लोकांमध्ये बोलले जात आहेत 

**************************************************************************

 लोकसत्यवाणी न्यूज च्या वतीने सर्व नागरिकांना नम्र आवाहन करीत आहोत. गाडीत जर गर्दी दिसत असेल, तर शक्यतो प्रवास टाळा. गेट वर उभे राहून धोकादायक असा जो प्रवास करण्याची जी वेळ येते. ती वेळ येणार नाही. जेणेकरून आपला जीव कसा सुरक्षित राहील याची प्रत्येकानी काळजी घ्यावी.

**************************************************************************

रेल्वे प्रशासनाच्या बेपर्वाईमुळे निष्पाप नागरिकांचा जो ६ जणांचा बळी गेला आहे,  त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, अशी लोकसत्यवाणी न्यूज यांच्या तर्फे भावपुर्ण श्रद्धांजली !

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या