2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे तत्कालीन पंतप्रधान आदरणीय लाल बहाद्दूर शास्त्री जी यांची जयंती जे एम एफ मधुबन वातानुकुलीत दालनांत साजरी करण्यात आली. प्रतिमेची पूजा करून गांधीजींचे ' वैष्णव जन तो तेने काहिये जी...हे भजन लावून गांधीजींच्या प्रती भावना व्यक्त केल्या.
स्वच्छ भारत , सुंदर भारत ह्या अंतर्गत महात्मा गांधीजींच्या विचाराच्या सरणीचा प्रभाव सर्व भारतीयांवर आहे. जे एम एफ शिक्षण संस्था अंतर्गत जन गण मन शाळा, महाविद्यालय , वंदे मातरम् पदवी महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यानी शाळेमध्ये स्वच्छ्ता अभियान राबविले. भारताचे सुजाण नागरिक म्हणून जबाबदारीने सर्व विद्यार्थ्यांनी शाळा ते कोपर स्टेशन पर्यंत रस्त्यावर जाऊन साफ सफाई केली.
0 टिप्पण्या