विद्या पाटील यांच्या कुटुंबियांचे भाजप महिला पदाधिकारी चित्रा वाघ यांनी केले सांत्वन

 




        भाजपकडून १ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्त    


डोंबिवली ( शंकर जाधव ) ३१ मे रोजी डोंबिवलीतील रहिवाशी विद्या पाटील यांचा कळवा रेल्वे स्थानकादरम्यान मोबाईल चोरट्याने धक्का दिल्याने रेल्वे खाली पडून दुर्देवी मृत्यू झाला.सोमवारी भारतीय जनता पार्टीचे नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस व भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या सूचनेनुसार भाजप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पाटील यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच यावेळी भाजपच्या वतीने एक लाख रुपयांचा धनादेश माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांनी पाटील कुटुंबियांकडे सुपूर्द केला.


 याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, जिल्हा सरचिटणीस प्रज्ञेश प्रभुघाटे, भाजपा डोंबिवली पश्चिम मंडल सरचिटणीस समीर चिटणीस, माजी नगरसेवक विकास म्हात्रे,माजी नगरसेविका कविता म्हात्रे, विद्या म्हात्रे, डॉ.सुनीता पाटील, कल्याण जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा रेखा चौधरी, भाजपा डोंबिवली पूर्व मंडल महिला आघाडीच्या अध्यक्षा पूनम पाटील, डोंबिवली ग्रामीण मंडल महिला आघाडीच्या अध्यक्षा मनीषा राणे, तसेंच  पदाधिकारी अमोल दामले, सुरेश जोशी,  दिलीप धुरी, मनीष शिंदे, रुचिता चव्हाण, गीता नवरे, सुरेश नेमाडे, कृष्णा परुळेकर, हर्षद सुर्वे, देवेश शुक्ला, महेंद्र ठाणेकर, हेमंत वैद्य, रोहित शुक्ला आदी कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी भाजप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी विद्या पाटील यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.त्या म्हणाल्या, रेल्वे यंत्रणेत मनुष्यबाळाची कमतरता आहे हे आपल्या सर्वाना माहित आहे. हायकोर्टने दिलेले निर्देश  पोलिसांकडे २००० होमगार्ड असणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात मात्र आजमितीला फक्त ४०० होमगार्ड कार्यरत आहेत. यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेतली.डोंबिवलीतील विद्या पाटील कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे.पाटील यांच्या कुटुंबियांना आर्थिक सहायक मिळावे म्हणून भाजपा पाठपुरावा करत आहे.तसेच आज भाजपा प्रदेशाच्या वतीने पाटील यांच्या कुटुंबियांना १ लाख रुपये धनादेश सुपूर्त केला. मला माहित आहे कि हि मदत तुटपुंजी आहे. आज तीन मुले आईच्या प्रेमाला अनिया मायेला पोरकी झालिया आहे. सामाजिक बांधलकी म्हणून पाटील कुटुंबियांना मदत केली आहे. विद्या पाटील यांना ज्या मोबाईल चोरट्याने धक्का दिला तो चोरता पकडला आहे. पण आजहि रेल्वेच्या महिला डब्यात महिलांच्या डब्यात सुरक्षततेचा प्रश्न सुटला नाही. कोरोना काळात रेल्वेच्या महिला डब्यात सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यत सुरक्षा रक्षक नेमावे अशी भाजपची मागणी आहे. तसेच कर्त्यव्यावर कसूर करणाऱ्यांवरही कारवाही झाली पाहिजे.दरम्यान भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्या शिफारशीनुसार सुरू झालेल्या डोंबिवली पश्चिमेकडील कान्होजी जेधे (भागशाळा ) मैदान जवळील सरस्वती हायस्कुल येथील लसीकरण केंद्राला भेट देऊन लसीकरण केंद्राच्या नियोजनात सहभागी झालेल्या भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे कौतुक केले.तसेच महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्राच्या व्यवस्थापनाबद्दलही समाधान व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या