22 जानेवारी 2015 रोजी भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजीनी बेटी बचाओ, बेटी पढाओ ' हा उपक्रम राबविण्याची मोहीम सुरू केली.त्या अंतर्गत जे एम एफ शिक्षण संस्था संचलित जन गण मन इंग्लिश सेकंडरी शाळा आणि विद्यामंदिर तसेच कनिष्ठ महाविद्यालय मधे देखील दिनांक 24 जानेवारी रोजी ' बेटी बचाओ, बेटी पढाओ ' हा कार्यक्रम सादर करण्यात आला.
सकाळच्या सत्रात जन गण मन इंग्लिश सेकंडरी शाळेच्या विद्यार्थ्यांनी ' बेटी बचाओ बेटी पढाओ ' या विषयावर भाषण केले व मुलगी वाचवा आणि शिकवा या विषयीची चित्र फित बघितली.
दुपारच्या सत्रात जन गण मन विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय यांनी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम सादर केला.संस्थेचे संस्थापक माननीय डॉ राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ प्रेरणा कोल्हे यांची उपस्थिती प्रार्थनीय होती. शिक्षणाच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन केले.
स्त्री भ्रूण हत्या, लिंग हत्या यावर प्रतिंबंध लागला पाहिजे या उद्देशाने बेटी बचाओ, बेटी पढाओ हा स्तुत्य उपक्रम आदरणीय नरेंद्र मोदीजीनी अमलात आणला.
मुलगी ही घरातली लक्ष्मी आहे , ती एका घरातून दुसऱ्या घरात सोन्याच्या पावलाने आगमन आणि निर्गमन करत असते,शिक्षणाने मुलगा हा फक्त एका घराचा विकास करतो परंतु मुलगी ही माहेर आणि सासर अशा दोन्ही घरचा विकास करते म्हणूनच मुलीला सरस्वती आणि लक्ष्मी अशा दोन्ही उपमा दिल्या आहेत ,असे डॉ राजकुमार कोल्हे यांनी सांगितले.सावित्री बाईंनी जनतेचे घाव सोसून शिक्षणाचा पाया रचला आणि सर्व मुलींना शिक्षणाच्या वाटा मोकळ्या करून दिल्या म्हणूनच आईच्या गर्भात असतानाच ती मुलगी सरस्वतीचा अंश होऊनच वाढत असते तर तिला जीवदान देऊनच असंख्य सावित्री उदयास येणार असे उद्गार डॉ.राजकुमार कोल्हे यांनी काढले.
तर आई मधील प्रेमळ ओलावा आणि वडिलांबद्दल आदरयुक्त भीती , या दोघांच्या वेलीवरचे फुल म्हणजे ' मुलगी मुलांपेक्षा मुली ह्या जास्त जवळच्या असतात, प्रेम, भावना, जिव्हाळा याच्याही पलीकडे जाऊन शिक्षणाने, प्रगल्भ विचाराने सक्षम होऊन घर संसार आणि नोकरी सांभाळून न थकता ऊर्जेचा स्रोत बनून कायमच दुसऱ्यांना ऊर्जा देत राहतात , म्हणूनच स्त्री ला ' नवदुर्गेची ' उपमा दिली आहे , असे सचिव डॉ प्रेरणा कोल्हे यांनी सांगितले.
जन गण मन इंग्लिश सेकंडरी शाळेच्या इयत्ता पाचवी मधील विद्यार्थ्यानी सावित्रीबाई फुलेंचे अप्रतिम नाटक सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. तसेच नाटक मधील सर्व मुलांना अध्यक्ष व सचिव यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. पालक व विद्यार्थ्यानी टाळा वाजवून त्यांच्या अभिनयाला दाद दिली.नाट्य विभागाचे शिक्षक श्री.प्रमोद पगारे व सौ.कविता गुप्ता यांनी नाटकाचे दिग्दर्शन केले तर सूत्र संचलन सौ.श्रेया कुलकर्णी यांनी केले .बेटी बचाओ,बेटी पढाओ, असा नारा देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

.jpeg)

0 टिप्पण्या