आपली शान मराठी, आपला अभिमान मराठी , माझी मराठीचीये बोली , अमृतातेही पैजा जिंके,अशा मराठी भाषेचा सर्वच महाराष्ट्रीयन माणसाला सार्थ अभिमान आहे.
ज्येष्ठ कवी, साहित्यिक वि. वा.शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी म्हणजे जन्म दिवस. अवघ्या महाराष्ट्रामधे हा दिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.
जे एम एफ प्रांगणात देखील मोठ्या उत्साहाने आणि अभिमानाने जन गण मन इंग्लिश सेकंडरी शाळा आणि विद्यामंदिर ने मराठी राजभाषा दिवस जल्लोषात साजरा केला.
जे एम एफ संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉ राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ प्रेरणा कोल्हे त्याच बरोबर मुख्याध्यापिका श्यामला राव, उप मुख्याध्यापिका ज्योती मॅडम तसेच सर्व शिक्षक , विद्यार्थी यांचे स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
सर्वप्रथम लेखकांच्या पुस्तकांची ग्रंथ दिंडी काढण्यात आली .पालखी मधे ग्रंथ ठेऊन ढोल ,ताशे लेझिम वाजवत जे एम एफ च्या प्रवेश द्वारातून दिंडीला सुरुवात झाली व मधुबन वातानुकुलीत दालनात दिंडीचे आगमन झाले.अध्यक्ष महोदय डॉ राजकुमार कोल्हे आणि आणि सचिव डॉ प्रेरणा कोल्हे यांनी दिंडीला ओवाळून फुले वाहिली. मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलन करण्यात आले व कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला हार घालण्यात आला.त्यानंतर इयत्ता चौथी मधल्या विद्यार्थ्यानी स्वागत गीत सादर केले.
मराठी भाषा ही वळवेल तशी वळते आणि हीच भाषा प्रत्येक वेस बदलता ५२ पद्धतीने ,वेगवेगळ्या लयी मधे बोलली जाते असे अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी सांगून.बाराखडी मधील ' अ ते ज्ञ ' म्हणजेच अज्ञाना कडून ज्ञानाकडे नेणारा मार्ग म्हणजेच शिक्षण आणि आपली मराठी भाषा आहे असे समर्पक उदाहरण दिले.माणुसकी जपा, मराठी अस्मिता जागृत असू द्या ,साहित्याचे वाचन करा आणि ते आत्मसात करा असे विद्यार्थ्यांना सांगून मराठी गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कविवर्य, लेखक ग. दि.माडगूळकर यांनी ' काय वाढले पानंवरती, काय वाढले पानावरती अशी दुअर्थी कविता लिहिली होती.अशाच स्वरचित कविता सादर करण्यात आल्या.
मराठी भाषेवर प्रभुत्व ,आणि मराठी विषयात पारंगत असलेल्या जे एम एफ संस्थेच्या सचिव डॉ प्रेरणा कोल्हे यांनी देखील स्वरचित कविता व स्वलिखित कथा वाचन करून उपस्थितांची मने जिंकली.' वाचाल तर वाचाल ' ह्या उक्ती प्रमाणे वाचनाचा ध्यास असावा असे सांगून मुलांचे मनोधैर्य वाढवले.
शाळेच्या मुख्याध्यापिका श्यामला राव तसेच मराठी शिक्षिका सौ सुप्रिया कांबळे व सौ.मानसी शिंगटे यांनी सुद्धा स्वरचित कवितांचे वाचन केले व कथा सांगितली.इयत्ता पाचवी च्या मुलामुलींनी ' लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी...हे मराठी अभिमान गीत गाऊन मराठी गौरव दिनाचे अभिवादन केले.
महाराष्ट्राची संस्कृती जपणारे मराठी नृत्य, नाटक सादर केले गेले.इयत्ता दुसरी मधील छोटे बालक कु.रुही मोरे,मनस्वी भारंबे, आयांश देगावे यांनी अस्सलिखित मराठी भाषेचे महत्व हा विषय घेऊन भाषण केले.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. घानिका व कु .देवयानी नाईक ह्या विद्यार्थी भगिनींनी केले.तर आभाप्रदर्शन कु .गार्गी भोसले हीने केले.
कार्यक्रमाची सांगता सौ.श्रेया कुलकर्णी यांनी श्री.संत ज्ञानेश्वर महाराज रचीत पसायदानाने करण्यात आली.




0 टिप्पण्या