पश्चिम महाराष्ट्र प्रतिष्ठान करंजाडे पनवेल आयोजित रक्तदान व महाआरोग्य शिबीराला जनतेचा उत्तम प्रतिसाद.
( पनवेल/आण्णासाहेब आहेर)
नागरिकांचे आरोग्य निरोगी राहावे तसेच नागरिकांमध्ये आरोग्य विषयी जनजागृती व्हावी या दृष्टीकोनातून पश्चिम महाराष्ट्र प्रतिष्ठान करंजाडे पनवेल यांच्या माध्यमातून रविवार दिनांक 1 ऑक्टोंबर 2023 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत ग्रामपंचायत करंजाडे, जिल्हा परिषद शाळा येथे भव्यदिव्य असे रक्तदान शिबीर आणि महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबीर मोठ्या उत्साहात, उत्तम प्रतिसादासह संपन्न झाले.यावेळी एकूण ७५ रक्त दात्यांनी रक्तदान केले आणि इतर २०० नागरिकांनी आरोग्य शिबीराचा लाभ घेतला.
पश्चिम महाराष्ट्रातील (सातारा, कोल्हापूर, सांगली, आणि सोलापूर ) नोकरी, व्यवसाय निमित्ताने मुंबई,नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्हामध्ये स्थायिक झालेली आहेत.या सर्वांचा एक परिवार जो एकमेकांच्या सुख दुःखात बरोबर राहील व मानसिक आधार आणि जिव्हाळा फक्त आपल्याच भागातील लोक एकमेकांना देतील हेच उद्दिष्ट लक्षात घेऊन अशा सुविचार संकल्पेनेतून ज्वालासिंह ज. देशमुख, शुभम धारेराव, डॉ. विक्रम पाटील, रामचंद्र महाडिक, अमित कांबिरे, सचिन गोरड, सचिन कदम, हेमा मोदी यांनी सर्वांना सोबत घेऊन या प्रतिष्ठानची करंजाडे, पनवेल येथे प्रतिष्ठानची सुरवात केली. करंजाडे ग्रामपंचायत (जिल्हा परिषद शाळेचा हॉल) करंजाडे पनवेल जि. रायगड येथे आयोजित केलेल्या आरोग्य शिबीरात रुग्णांची मोफत नेत्रतपासणी, ब्लड प्रेशर तपासणी, शुगर तपासणी, हृदयाची इसीजी तपासणी हाडांची घनता, सीबीसी तपासणी करण्यात आली.विविध रुग्णांना डॉक्टरांनी मोफत सल्ला दिला. यावेळी रुग्णांनी या मोफत तपासणीचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र प्रतिष्ठान यांच्या बरोबर सनराईज हॉस्पीटल करंजाडे,सिमीरा डायग्नोस्टिक सेंटर करंजाडे,तेरणा मल्टीस्पेशालिटी आणि रिसर्च सेंटर नेरूळ, साई ब्लड बँक पनवेल आदिचे विशेष सहकार्य लाभले.
यावेळी सरपंच मंगेश शेलार, उपसरपंच सागर आंग्रे , कोकण म्हाडाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील,स्वराज्य संघटनेचे राज्य उपाध्यक्ष विनोद साबळे , मुख्य दक्षता अधिकारी (MSEB) किशोर पाटील, माजी सरपंच रामेश्वर आंग्रे,पोलीस उपनिरीक्षक संजय धारेराव आदी मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. विक्रम पाटील,ज्वालासिंह देशमुख,
रामचंद्र महाडिक,शुभम धारेराव,अमित कांबिरे,सचिन गोरड,सचिन कदम,नितीन कुंभार,संदीप चव्हाण,यशवंत घाडगे,अजित कदम,दादासाहेब मोरे,किरण कंक, शिवाजी सुंबळे, योगेश गोरे,महादेव पाटील, नंदकुमार महाजन आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.सूत्रसंचालन रामचंद्र महाडिक आणि आभार प्रदर्शन डॉ.विक्रम पाटील यांनी केले.विशेष म्हणजे पहिल्यांदाच राबविलेल्या रक्तदान शिबीर व आरोग्य शिबीराला जनतेचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे.
यापुढेही असेच समाज उपयोगी आणि सामाजिक बांधिलकी जपणारे कार्यक्रम पुढेही घेण्याचा विचार पश्चिम महाराष्ट्र प्रतिष्ठान च्या सदस्यांचा आहे तसेच पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यामध्ये प्रतिष्ठान वाढवण्यासाठी प्रयत्न करू असे मत ज्वालासिंह ज. देशमुख यांनी
व्यक्त केले.
0 टिप्पण्या