निमित्त वाढदिवसाचे आयोजन जनसेवेचे

 

प्रतिनिधी (नवी मुंबई) सुभाष हांडे देशमुख :


रायगड जिल्ह्यात होत असलेल्या पावसाच्या अतिवृष्टीमुळे तेथील संपूर्ण जीवनमान विस्कळीत तर झाले आहेच त्याचबरोबर इरशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या,  आदिवासी वसाहत असलेल्या इरशाळवाडीला डोंगर समाधी मिळाली. या दुर्घटनेत काही मृत्युमुखी पडले तर बहुसंख्येने बेपत्ता झालेले  आहेत.  या नैसर्गिक आपत्तीमुळे ओढवलेल्या दुर्घटनेचे भान ठेवून माजी नगरसेवक  सुरज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने, नेरुळ मधील आगरी कोळी नाट्यगृहात त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा दिनांक २० जुलै रोजी उत्साहात संपन्न झाला. लोकनेते आमदार गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात परिसरातील शालांत परीक्षेत व इयत्ता बारावीच्या परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवून यशस्वी ठरलेल्या शालेय विद्यार्थ्यांना सन्मानपत्र, शाल देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला तर ज्येष्ठ नागरिकांना शाल व छत्री देऊन त्यांचा यथायोग्य सन्मान करण्यात आला.


इरशाळ वाडीतील दुर्घटनेत मृत पावलेल्या व्यक्तींस श्रद्धांजली वाहून सुरु झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना लोकनेते आमदार गणेश नाईक म्हणाले की,  सुरज पाटील यांनी  जनसेवेचे व्रत घेऊन, त्यात प्रयत्नपूर्वक सातत्य ठेवून,  कुकशेत व सारसोळे गाव तसेच परिसरातील वसाहत येथे विविध प्रकारची भरीव अशी सर्व स्तरांवर विकास कामे करुन मानवसेवेचा आदर्श समाजापुढे ठेवला आहे. त्याचबरोबर आज ज्येष्ठांचा आणि मुलांचा गुणगौरव करून, भूतकाळ आणि भविष्यकाळ घडविणाऱ्या या दोन्ही पिढ्यांचा याथायोग्य सन्मान करून आजपर्यंत केलेले समाजसेवेचे काम अधिक अधोरेखित केले आहे. असे सांगून,  

सुरज पाटील हे सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊन त्यांच्या अडीअडचणी तत्परतेने सोडवणारे व्यक्तिमत्व असल्याचे गौरवोद्गारही लोकनेते नाईक यांनी याप्रसंगी काढले. 


 याप्रसंगी माजी खासदार डॉ. संजीव नाईक, माजी सभागृह नेते रविंद्र इथापे, समाजसेवक गणेश भगत, माजी नगरसेवक गिरीश म्हात्रे, माजी नगरसेवक अमित मेढकर, माजी नगरसेवक मुनावर पटेल, माजी परिवहन सभापती प्रदीप गवस, माजी नगरसेविका रुपाली भगत, माजी नगरसेविका जयश्री ठाकूर, माजी नगरसेविका सुजाता सुरज पाटील, ॲड निरंत पाटील, आरपीआयचे चंद्र जगताप, विरेंद्र लगाडे,  डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाचे अधिकारी डी. डी. कोलते, अशोक त्रिपाठी, अजय सिंग ठाकूर, शेखर भोपी, देवनाथ म्हात्रे, गणपतबुवा भोपी, अशोक आतकरी, अँड गणेश भगत, सचिन पाटील, अनिल लोखंडे, रामचंद्र पाटील, प्रभाकरराव साळुंखे,  शशी जोशी,  विजय निंबाळकर, सुभाष हांडे देशमुख यासह जेष्ठ नागरिक, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

 

पाहुण्यांचे यथायोग्य स्वागत करुन सुरज पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, सामान्य जनतेच्या विश्वासावर आणि पाठिंब्यावर आम्ही लोकप्रतिनिधी म्हणुन निवडुन येतो. साहजिकच  जबाबदारीची जाणीव असते. म्हणूनच त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता त्यांची सेवा करणे हे मी माझे परम कर्तव्य मानतो. ज्येष्ठांच्या अनुभवांतून आम्ही शिकत आलो आहोत. वाईट प्रसंगाला ताकदीने सामोरे जाण्याची प्रेरणा, सकारात्मक ऊर्जा ज्येष्ठांकडून मिळते. त्याचप्रमाणे समाजाचे भविष्य असणारे विद्यार्थी यांचा सत्कार, असा दुहेरी संगम याप्रसंगी आपण सार्थ केला असून याचा मनस्वी आनंद होतो आहे,  असं सांगून लोकनेते गणेश नाईक यांच्या विचारांशी बांधिलकी ठेवूनच मी सर्वोपतरी कार्यरत आहे असेही त्यांनी सूचित केले.


 बजरंग माने व डी. महेश यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खूप सुंदरतेने केले.


जय गजानन मित्र मंडळ कुकशेत गाव आणि सुरज मित्र मंडळ सारसोळे गाव, सेक्टर - ६ यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन खूप मेहनत घेऊन यशस्वीपणे केले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या