प्रतिनिधी (नवी मुंबई) सुभाष हांडे देशमुख:
नवी मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नेरुळ येथील वंडर्सपार्क मधे दिनांक २२ जुलै २०२३ रोजी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीपजी नाईक यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. प्रसंगी १०० विविध प्रकारच्या फळझाडांच्या रोपांची लागवड करण्यात आली. बहुसंख्य नागरिकांनी या उपक्रमात सहयोग दिला.
याप्रसंगी आयोजक मा.नगरसेवक तथा सभागृह नेते रविंद्र इथापे, मा.नगरसेवक सुरेश शेट्टी, उद्द्योजक दिनेशभाई पासोरिया, अतिरिक्त आयुक्त संजय निकम, सुनिल सैनी, अंकुश हाडवळे, गणेश मोरे, अशोक भांडवलकर, गिरीश देशमुख, राजीव अगरवाल, अनिल लोखंडे, अतुल पांडे, आप्पा इंदोरे, प्रविण जैन, महादेव गुर्जर, अनिल गुप्ता,अशोकशेठ हिंगे, सौ. संध्या वारिंगे व सहकारी, सौ. रुचिता कर्पे, अजित कौर धिल्लोन व सहकारी तसेच बहुसंख्य महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी श्री संदीप नाईक उपस्थितांशी संवाद साधताना म्हणाले की, आज सकाळी सात वाजता एवढ्या पावसात देखील मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपले व रविंद्र इथापे यांचे कौतुक करतो. आज सर्व नवी मुंबई शहरात आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्याची सुरुवात या वंडर्सपार्क पासुनच होतेय. आज ज्या पध्दतीने उपमुख्यमंत्री महाराष्ट्रात विकासाची कामे करतात ते पाहिल्यावर अभिमान वाटतो. तसेच *श्री रविंद्र इथापे यांनीदेखील महिला व नागरिकांचे आभार मानले व संदीपजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली आम्ही नमुंमनपामध्ये एकत्र काम केले असून त्यांनी स्थायी समिती सभापती ते आमदार अशा प्रवासात नवी मुंबईला दिशा देण्याचे काम केले असून, निश्चित स्वरूपात ते भारतीय जनता पक्षाचा झेंडा येत्या मनपाच्या निवडणूकीत नवी मुंबई पालिकेवर फडकवल्याशिवाय राहणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे. असे श्री रविंद्र इथापे यांनी सांगितले.
--------------------------------
0 टिप्पण्या