प्रतिनिधी :भालचंद्र माने. नेरूळ, नवी मुंबई
गटारी नव्हे दीप अमावस्या अथवा वर्षासहलअसे सावरण्याचा प्रयत्न आहे. 1970 च्या शतकात मुंबई कष्टकऱ्यांची गिरणी कामगारांची तिथे परप्रांतीय कमीच विशेष कोकण आणि देशावरची राहत. पुढील प्रांतातील लोक असे कमीच मुंबई महाराष्ट्र आणि महाराष्ट्र मुंबई असा एक काळ पाऊस सुरू होतो आणि त्याच वेळेला वेध लागतात काहीतरी चटपट खाण्याचे कष्टकऱ्यांसाठी ओसाड म्हणजे मटन मच्छी थोडी नशा पाणी होतीच. त्याच वेळेला पुढे श्रावण ,गणपती, नवरात्र , दिवाळी असे धार्मिक कार्यक्रम आहेतच. त्यावेळेला शेजारीपाजारी राहणारे सोबत राहणारे व गावाकडून एक तसा निरोप द्यायचे चातुर्मास सुरू होतोय . ओशाड काय खाऊ नका. त्याच वेळेला मुंबईतील कामगार कष्टकरी आता पुढे चातुर्मास सुरु होणार म्हणून एक रविवार खाऊन पिऊन घ्यायचे तर्र व्हायचे. त्यावेळेला मुंबईतील बहुतेक रचना चाळ संस्कृती आणि चाळीच्या शेजारी बहुतेक ठिकाणी उघडे नाले पद्धतीची गटारं होती. पुढे चातुर्मास काही खाना पिना करायचे नाही उद्देशाने आषाढी अमावस्याला आपला मस्त खाऊन पिऊन तर होऊन घरी यायचा आणि वाटेत कुठेतरी पडायचं बहुतेक वेळा तो रस्त्याच्या कडेला गटारीत पडायचा आणि अशी ही गटारी सुरू झाली असेच वाटते. पुढे पुढे याला मित्रमंडळीत चांगले स्थान आले. हसत खेळत मस्करीत कोणाचाहीअपमान करण्याचा खेळ झाला. मस्करीत कुस्करी होऊ नये इतकीच काळजी असावी. आता गटारीच्या नावाने मित्रमंडळी एकत्र येऊन पार्ट्या सहली करून हसत खेळत आपले मन मोकळे नाचत एक प्रकारे सण साजरा करतात. आता विश्वस्तरावर गणपती सण गेला आहे .तसेच भविष्यात हा गटारी सण विश्वस्तरावर जाईल असा नक्कीच विश्वास आहे. कारण आता त्याला जाहीर रीत्या रस्त्यावरती फलक लावून व सोशल मीडिया द्वारे त्याला खूप प्रसिद्धी मिळत आहे. आणि लोकांना तर काय पाहिजे असते एक आनंद खाणे पिणे मौज मस्ती.
0 टिप्पण्या