दगडखाणीमुळे आदीवासी बांधवांच्या घरांच्या भिंत्तीना तडे


      आदीवासी बांधवांचे मुख्यमंत्र्यांना पत्र..    


कल्याण तालुक्यातील कांबा पठार पाड्यातील प्रकार


 

 

  डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण तालुक्यातील कांबा ग्रामपंयातचीनजीक असलेल्या पठारपाडय़ातील आदिवासी नागरीकांची दगडखाणींनी झोप उडवली आहे. दगडखाणीत केल्या जाणाऱ्या ब्लास्टिंगमुळे त्यांच्या घरांच्या भिंत्तींना तडे गेले आहे.आदिवासी बांधवांनी या दगडखाणींच्या विरोधात कारवाई करण्याची मागणीसाठी येथील आदिवासी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत,तहसीलदारपासून ते मुख्यमंत्र्यापर्यंत पत्रव्यवहार केला. मात्र अद्याप यावर शासनाने तोडगा काढलेला नाही.अधिकार्‍यांकडून पाहणी पलीकडे काहीच कारवाई झाली नसल्याचे  ग्रामस्थांनी सांगितले.



  कल्याण तालुक्यात कल्याण मुरबाड रोड लगत कांबा गाव आहे.या कांबा ग्रामपंचायतीत असलेल्या पठारपाडा येथे आदिवासि बांधवांची ३५ घरे आहे. याठिकाणी १७५ लोकांची लोकवस्ती आहे.या पाडय़ाशेजारी असलेल्या दगडखाणीतून दगड काढण्यासाठी स्फोट केले जातात. त्यामुळे या नागरीकांची झोप उडाली आहे. या ब्लास्टिंगमुळे नागरिकांच्या माती आणि विटांच्या बांधकाम असलेल्या घरांना स्फोटामुळे तडे गेलेले आहेत. या तडे गेलेल्या घरात आदिवासी बांधव रात्री झोप लागत नाही. रात्री घराची भिंत कोसळण्याची भीती असल्याने या ठिकानचे रहिवासी लहान मुलांसह हे लोक घरांच्या अंगणात झोपतात. सध्या प्रचंड थंडी आहे.त्यामुळे मुलांना घेऊन थंडीत ही मंडळी घराबाहेर झोपतात.स्टोन क्रेशन मशीनमुळे ध्वनी प्रदूषण होते.त्याचाही त्रास आदिवासी बांधवाना  होतो.दुसरीकडे धुळीमुळे या पाड्यातील शेतजमिनी देखिल नापीक होऊ लागल्या आहेत .    



      या त्रासाबाबत येथील आदिवासी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत,तहसीलदारपासून ते मुख्यमंत्र्यापर्यंत पत्रव्यवहार केला. मात्र अद्याप यावर शासनाने तोडगा काढलेला नाही. अधिकार्‍यांकडून पाहणी पलीकडे काहीच कारवाई झाली नसल्याचे  ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे आता आम्ही जगावे की मारावे असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे  .सरकारने  तक्रारीची दखल घेऊन या त्रासातून आमची  सूटका करावी अशी मागणी केली आहे. तर याबाबत प्रांत अधिकारी अभिजीत भांडे पाटील यांनी लीजवर दगडखाणीकरीता जमीन दिली असल्याचे सांगत मध्यम मार्ग काढण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यलयास  पाठविण्यात आल्याचे सांगितले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या