मुंबईतही दरड कोसळण्याचा धोकाशासनाने त्वरित उपाययोजना करावी

 


इर्शाळवाडी घटनेच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रविण दरेकरांची मागणी


मुंबई- रायगडच्या खालापूर येथील इर्शाळवाडी येथे बुधवारी मध्यरात्री अतिवृष्टीमुळे दरड कोसळून १६ जणांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी मुंबईतही पावसाळ्यात दरड कोसळण्याचा धोका असून तेथे राहणारे हजारो लोकं मृत्यूमुखी पडू शकतात. त्यामुळे शासनाने याची दखल घेऊन त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी विधानपरिषदेत केली.


प्रश्नोत्तराच्या तासावेळी बोलताना दरेकर म्हणाले की, ही आपत्ती ग्रामीण भागात येत असताना मुंबईही अशा प्रकारच्या धोक्यावर उभी आहे. मुंबईच्या डोंगराळ भागात साधारणतः २२ हजार ४८३ कुटुंबांचा जीव सतत टांगणीला लागलेला आहे. अनेक वसाहती टेकड्यांवर वसलेल्या आहेत. गेल्या ३१ वर्षात साधारणतः ३१० लोकं मुंबईत मृत्यूमुखी पडले आहेत. मी गांभीर्याने निदर्शनास आणतो की, आज ३६ पैकी जवळपास २५ मतदार संघात २५७ ठिकाणी डोंगरावर वस्त्या आहेत. मुंबईत ५-१० वस्त्या असतात. तेथे हजारोंच्या संख्येने लोकं मृत्यूमुखी पडू शकतात. मुंबईच्या ज्या-ज्या ठिकाणी भूस्खलन कुठं होणार मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाने वस्त्या दिलेल्या आहेत. त्यांना शिफ्टिंग करा, त्याठिकाणी संरक्षक भिंत बांधा. उद्या मुंबईत जर का हादसा झाला तर दखल घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे. ती संख्या थोडी नसेल. घाटकोपर, कुर्ला येथे झाले आहे. मुंबईतील डोंगरावरच्या ज्या वस्त्या आहेत त्या पावसात दरड कोसळण्याचा धोका होऊ शकतो. त्याची गांभीर्याने दखल घ्यावी व त्वरित त्यावर काय संरक्षण देता येईल हे सरकारने ठरवावे, अशी मागणी दरेकर यांनी केली.


दरेकर यांच्या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री अनिल पाटील यांनी म्हटले की, याबाबत जिल्हाधिकारी आणि संबंधित यंत्रणांना कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून तात्काळ सूचना केल्या जातील. मी स्वतः याबाबत व्यक्तिशः दखल घेत असून लक्ष ठेवून आहे. ज्या-ज्या कारवाया करता येतील त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले जातील.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या