आंबेडकरी चळवळीतील राजाभाऊ गायकवाड
लेखक;- भटु हरचंद जगदेव
राजाभाऊ गायकवाड सरांची आणि माझी ओळख कल्याण येथे लोग्राम येथे झालेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य संमेलनात झाली त्यांच्या सोबत त्यांचे गावाचे आयुष्यमान यशवंत गायकवाड साहेब हे देखील होते. आता मला निटस आठवत नाही. कुठल्यातरी विचारवंताचे भाषण चालू होते. ते मन लावून ऐकत होते. मग नंतर मला ही जोडी अनेक कार्यक्रमात भेटत होती. यातून आम्ही नेहमीच भेटत असत.
मी पडघ्यात राहत असल्यामुळे राजा भाऊ गायकवाड सर कधी पडघ्यात आले तर मला हमखास भेटलेवाचून जात नसत मग त्यांच्यासोबत सुरेश जाधव ही असायचे आणि नेहमी आंबेडकर चळवळीच्या गोष्टी करत असतं म्हणून मला ठाणे जिल्ह्यातील आंबेडकरी चळव ळीत काम करणाऱ्या लोकांची ओळख होत असे मी भिवंडीत काम करत असल्यामुळे भिवंडीच्या जवळपास कुठेतरी राहावे असे मला वाटत होते म्हणून मी पडघा सोडण्याचा प्रयत्न करत होतो. राहण्यासाठी भाड्याने रुम शोधत होतो. माझे लहाण बहीण मेहुणे विनोद ढिवरे गोरसई येथे राहत असल्यामुळे त्याच गावात माझे मित्र संतोष घोटकर राहत होते. म्हणून मी गोरसई गावात राहण्यासाठी भाड्याने विलास केणे यांच्या चाळीत रुम भाड्याने घेतला आणि मला कामाला जाण्यासाठी जवळ झाले, जवळ पास कार्यक्रम कुठेही असो मी जावू लागलो होतो. म्हणून कुठलाही कार्यक्रमात नेहमी नेहमी भेटणारे राजाभाऊ गायकवाड सर मला गोरसईत दिसले, मला त्यांना बघून खूपच आनंद झाला आणि त्यांना मोठ्याने मी जयभिम करुन त्यांच्या जवळ गेलो, त्यांनी मला जयभिम करुन प्रश्न केला, भटु इकडे कुठे? मी म्हणालो, सर तुम्ही इथे कसे, सर म्हणाले, हे माझे गाव आहे, आणि मी येथेच राहतो. मी म्हणालो, सर मी याच गावात भाड्याने रुम घेतला आहे. सर म्हणाले, बरे झाले चला आता आपल्याला रोज भेटता येईल सरांनी मला आग्रह करुन त्यांच्या घरी नेले आणि मी कधी पासून गोरसईत राहायला आलो त्याची चौकशी केली. त्यांच्या घरी चहापाणी झाले आणि मी निघालो असता तर ते म्हणाले, भटु अधुन मधुन नि:संकोचपणे आपले समजुन येत राहा त्यांचा आग्रह खुपच निराळा होता. त्यात आपुलकी होती. प्रेम होते. माया होती. मैत्री होती, आणि त्यांच्या स्वभावामुळे मी त्यांच्या जवळ येत गेलो त्यातुनच सरांनी माझी ओळख त्यांच्या शाळेतील शिक्षक संजय मोरे सर आणि दाभाडचे प्रभाकर जाधव सर यांच्याशी करुन दिली.
गायकवाडसर श्रमिक मंडळ भिवंडी या संस्थेचे सचिव आहेत आणि या संस्थेच्या माध्यमातून शाळा चालवत आहेत सरांनी 1979 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला चालू केली होती. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेचे पुष्प गुफण्यासाठी मोठ-मोठ्या साहित्यिकांना व बडे बडे नेत्यांना सामाजिक कार्यकर्ते बोलुन लोकांना कार्यक्रम आयोजित करून साहित्य मेजवानी देत असत.
एके दिवशी मला संजय मोरेसर भेटले. मोरे सरांना राजाभाऊ गायकवाड सरांनी त्यांच्या श्रमिक मंडळाच्या शाळेत शिक्षक म्हणून नियुक्त केले होते. आपल्या शिफारशीने. संजय मोरे सर सुद्धा माझ्या सारखेच गोरसई गावात भाड्याने रुम घेऊन राहत होते. संजय मोरे सर हुशार होते. कुठल्याही कार्यक्रम राहिलास तर मोरे सर आणि राजाभाऊ गायकवाड सर मला सोबत घेऊन लागले होते. अशातच मोरे सर म्हणाले, जगदेव गायकवाड सरांचा एका संस्थेने सत्कार ठेवला आहे. तुम्हाला सरांबद्दल काही लिहिता येईल का? ते आपण स्मरणीकेत छापणार आहोत. मी मोरे सरांना होकार दिला आणि कामाला लागलो होतो.
राजाभाऊ गायकवाड हे हाडाचे कार्यकर्ते आहेत लोकांना जोडून ठेवण्याचे त्यांच्याकडे कला आहे. त्यांची वाणी गोड आहे. आंबेडकरी चळवळीचे लोक त्यांना मोहाळा सारखे जुळत असतात. आणि त्यांची कीर्ती पूर्ण ठाणे जिल्ह्यात नव्हे तर मुंबई प्रांतात देखील आहे. त्यांना समाजाचे तर सोडा त्यांना ठाणे जिल्ह्यातील हर एक व्यक्ती ओळखत होते. एके दिवशी गोरसईचे कार्यकर्ते, कार्यकर्ता भरत जाधव यांनी सावित्री बाई फुले यांच्या स्मृतीदिनाच्या कार्यक्रम आयोजित केला होता. त्या ठिकाणी माननीय प्रा. साहित्य शुक्राचार्य गायकवाड सर तसेच प्रा. साहित्यिक दामोदर मोरे सर आले होते. तर राजा भाऊ गायकवाड सरांनी माझी ओळख प्राध्यापक साहित्यिक शुक्राचार्य गायकवाड सर व प्रा. दामोदर मोरे सर यांच्याशी ओळख करून दिली आणि म्हणाले, भटू हे कवी आहेत. थोडेफार लिहितात माझ्या मनात एक गोष्ट आली की, खरोखर आपण चांगल्या गावात राहायला आलो आहोत. गोरसई गावाच्या मातीतुन चांगले लोक निर्माण झाले आहेत. चांगल्या उच्चतम दर्जाचे साहित्यिक व समाज सेवक या गावाने दिले आहेत. गोरसई गावा विषयी गर्व वाटला.
राजाभाऊ गायकवाड सर यांचा जन्म गोरसई गावात दिनांक १५/२/१९५४ मधे झाला आई गुणाबाई वडील मारुती गायकवाड हे गोरसई गावाचे शेतकरी होते. आणि राजाभाऊ गायकवाड सरांचा जन्म एक शेतकरी कुटुंबात झाला होता. राजाभाऊ चे शिक्षण इयत्ता १ ली ते ४ थी आपल्याच गोरसई गावात झाले, आई वडिलांचा लाडका असलेला राजा आपल्या मित्रांमध्ये ही ते लाडके व आवडते होते. शाळे बरोबर ते बौद्ध धम्माचे शिक्षण ही आत्मसात करत होते. आई वडिलांनी त्यांना चांगले संस्कार दिले होते. त्यांचे आई वडीलावर डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६ मध्ये घेतलेल्या धर्मांतराचा मोठा प्रभाव झाला होता, म्हणून त्यांनी आपल्या मुलाला लहान वयापासून धम्म संस्कार देयायला सुरुवात केली होती. आणि राजाभाऊ यांनी आपल्या लहान वयातच बुध्द वंदना,धम्म वंदना, धम्मपालन गाथा, संघ वंदना, पंचशिल, त्रिशरण आर्य अष्टांग मार्ग यांचे धडे दिले होते आणि राजाभाऊने लहानपणा पासूनच बौद्ध धम्माचे गुण आत्मसात केले होते.
राजाभाऊ चौथी पास झाल्यावर त्यांनी पडघा येथे माध्यमिक शिक्षणासाठी जिल्हा परिषद शाळेत दाखला घेतला यांचे माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांच्या वडिलांनी त्यांना भिवंडीत अण्णासाहेब जाधव उच्च माध्यमिक हायस्कूल धामणकर नाका येथे दाखला घेतला आणि तेथेच त्यांच्या खऱ्या आंबेडकरी चळवळीला सुरुवात झाली त्या काळात दलित लोकांवर बरेच जुलूम, अत्याचार होत होते. आंबेडकरी चळवळीशी एकनिष्ठ असल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले, शाहु महाराज, बिरसा मुंडा अशा महान महापुरुषांच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी समाजाच्या हितासाठी आपले जीवन झोकून दिले. समाजाच्या हितासाठी सदैव झटत राहातं जनमानसाचे भल्याचे संकल्प करून ते दलित पॅंथरच्या चळवळीत सक्रिय होऊन मोर्चे, आंदोलनं, धरणे यामध्ये नेटाने काम करत माननीय रामदास आठवले, शाम दादा गायकवाड, सुरेश सावंत, अण्णासाहेब रोकडे, नामदेव ढसाळ, राजा ढाले बरेच आंबेडकरी नेत्यांसोबत व त्यावेळेचे दलित पँथरच्या त्यांच्या खांद्याला खांदा लावून आपल्या सोबत इतर कार्यकर्ते डॉक्टर जगताप, डी.जे सपकाळ, सुरेश जाधव पडघा, शामूताई भोईर, मोहन गायकवाड, वसंत कांबळे, मिलिंद तायडे, आयु.यशवंत गायकवाड या साऱ्या सहकारीच्या बरोबर दलित पँथरच्या ठाणे जिल्ह्या संघटक म्हणून काम पाहिले.
राजाभाऊ गायकवाड सर लहानपणापासून हुशार व चंचल मनमिळावू होते त्यांनी विद्यार्थीदशेतच लोकांना जोडण्याचे काम करत होते. ते एवढ्यावरच थांबले नाहीत. नवीन कार्यक्रम आपल्या गावात तालुक्यात शहरात व तसेच कुणावर कुठे अन्याय अत्याचार झाला तर ते आपल्या दलित पॅंथरच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन अन्याय अत्याचार झालेल्या लोकांना न्याय मिळवून देत होते.
समाजाच्या लोकांच्या मनात साहित्या विषय व महापुरुषांविषयी एक आवड निर्माण करुन अनेक विचारवंतांना बोलवून डॉ बाबासाहेब आंबेडकर व्याख्यान मालेचे पुष्प विनले व जन मानसाच्या मनात बाबासाहेबाचे विचार रुजुन माणसाच्या मनात खाद्य पुरवले जावेत म्हणून त्यांनी ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यान मालेचे स्थापना केली होती. त्या मार्फत मोठ मोठे साहित्यिक आणून साहाय्य करत राहिले, त्यांनी व्याख्यानमालेचे माला गुफण्यासाठी साहित्यिक अर्जुन डांगळे यांना आणून लोकांच्या भल्याचे काम केले आहे. ते एवढ्यावरच थांबले नाहीत त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यान माले चे पुष्प गुफण्यासाठी बौद्ध नेते मा. पा. ना. राजभोज व मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू बॅरिस्टर आर.पी. नाथ, प्रा. वि. एन संदानशिव सिध्दार्थ काॅलेजचे अशा मान्यवर लोकांना आणून आपण स्थापन केलेल्या व्याख्यान मालेचे पुष्प गुफून समाजात कसे परिवर्तन घडुन येईल आणि डॉ. बाबा साहेबांचे स्वप्न साकार कसे करता येईल हाच ध्यास त्यांच्या मनात होता. त्यांनी व्याख्यानमालेचे पुष्प गुंफून उत्कृष्टपणे सफल करुन दाखवले आहेत.
भिवंडी शहरात आंबेडकरी साहित्य संमेलन व्हावे म्हणून त्यांना खुप वाटत होते. म्हणून त्यांनी भिवंडीत काही मोजक्या लोकांची मिटिंग बोलून साहित्य संमेलन आपल्या भिवंडी शहरात व्हावे म्हणून पुढाकार घेतला आणि चंद्रमणी बुद्ध विहार येथे मिटिंग झाली. आंबेडकरी साहित्य संमेलन घेण्याचे एकमताने मंजूर झाले, ते पहिले भिवंडी घेतले जाणारे आंबेडकरी साहित्य संमेलनाचे संमेलन अध्यक्ष भिवंडीतले भूमिपुत्र जेष्ठ साहित्यिक प्रा. शुक्राचार्य गायकवाड सर यांच्या गळ्यात अध्यक्ष पदाची माळ घातली आणि स्वागत अध्यक्ष आयु. सिताराम जाधव साहेब यांनी स्विकारले २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या साहित्य संमेलनात राजाभाऊ गायकवाड सरांनी मला पहिला कवितासंग्रह काढण्यासाठी प्रेरणा दिली होती.
राजाभाऊ गायकवाड सर यांचे कार्य व त्यांची पाऊल पुढे चालत होते. समाजकार्य करताना त्यांनी मागे वळून बघितले नाही, म्हणून भिवंडीत सामाजिक कार्य करत असलेले राजा भाऊ गायकवाड यांचे अनेक सत्कार झाले. त्यांचा महत्त्वाचा सत्कार तो माईसाहेब आंबेडकर यांच्या शुभ हस्ते 1988 मध्ये खडवली येथे करण्यात आले होते. तसेच डोंबिवलीचे माजी मंत्री जगन्नाथ पाटील साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता. तसेच ए.बी.एम संस्थेचे आश्रम शाळेचे शिरोडा येथे झाले, महाराष्ट्राचे चीफ सेक्रेटरी मान्य रत्नाकर गायकवाड साहेब यांच्या कडून सत्कार करण्यात आला होता. तसेच राजा भाऊ गायकवाड सरांचे काम बघून 15. 2. 2004 रोजी ग्रामोदय परिवाराचे अध्यक्ष रमेश मुकादम यांनी सरांच्या 50 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने हेरून राजाभाऊंचा सत्कार व गौरव करण्यात आला होता. तसेच भिवंडी सामाजिक काम करणारी संस्था इंडियन वुमन चिल्ड्रन फाउंडेशन भिवंडी या संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर जाधव सर व संस्थेच्या मार्फत 2006 मध्ये सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले होते
राजाभाऊ यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यान मालेचे पुष्प गुंफण्यासाठी महाराष्ट्राचे शिक्षण महर्षी बि.डी. जाधव साहेब यांना पाचारण केले होते. आणि आज ही व्याख्यानमालेचे पुष्प अनेक साहित्यिक व मोठ मोठे विचारवंतांकडून गुंफून घेतांना आपल्याला दिसत आहेत.
राजाभाऊ गायकवाड सर यांना त्यांच्या सो गायकवाड ताई यांनी आयुष्यभर समाजकार्य करायला मोलाचे योगदान दिले आहे. राजाभाऊ हे नाव हा व्यक्ती लहानपणा पासूनच अथांग परिश्रम घेऊन आजही ते समाजाच्या भल्यासाठी अहोरात्र परिश्रम घेताना सर्वांचा लाडका राजाभाऊ सर्व क्षेत्रात म्हणजे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक विशेष आदिवासी लोकांचा सर्व परीने निस्वार्थ भावनेने काम करताना आपल्याला दिसून आले आहेत. तसेच जिल्ह्याचे अनेक सामाजिक व शैक्षणिक संस्थाशी संलग्न राहून त्यांच्या सर्वांच्या सुख-दुःखात सहभागी राजाभाऊ मारुती गायकवाड असाच मायेचा, करूनेचा, मैत्रीचा मळा फुलवत राहून साऱ्या मानव समाजाला चांगला उत्कृष्ट धडा गिरवुन राहतील याच्यात काही शंका नाही. त्यांच्या अशाच मैत्रीचा विकास व हसत खेळत शिक्षक म्हणून मानव सेवा करत श्रमिक मंडळ भिवंडीचे सेक्रेटरीची धुरा सांभाळत लोकांची, सामाजाची, राष्ट्राची, देशाची सेवा करताना आपल्याला दिसत आहेत. हे नित्य सत्य आहे.
आज निधड्या छातीचा पँथर आपल्यातून असे अच्यानक जाण्याने सर्व आंबेडकरी समाजावर दु:खाची छाया पसरली आहे. आंबेडकरी जनतेचे मोठे नुकसान झाले आहे.
0 टिप्पण्या