१ ऑगस्ट २०२२
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे १०२ व्या जयंतीनिमित्त कविता-
साहित्यरत्न - अण्णा भाऊ साठे
१ ऑगस्ट १९२० रोजी |
सांगली जिल्ह्यात |
जन्मले अण्णा भाऊ |
वाळवा तालुक्यातील वाटेगावात ||
वडीलांचे नाव भाऊ |
आईचे नाव वालुबाई |
अण्णा भाऊंचे |
मूळ नाव तुकाराम ||
मुंबई ते वाटेगाव |
अण्णा भाऊंनी केला |
पायी प्रवास अन् |
झाले मुंबईत दाखल ||
मुंबईत केली नोकरी |
गिरणी कामगार अण्णा भाऊंनी |
लाल बावटा कला पथकाची|
केली स्थापना अण्णा भाऊंनी ||
कष्टकरी श्रमिकांच्या न्यायासाठी |
अण्णा भाऊंनी केले नेतृत्व |
साहित्यातून परिवर्तन निर्मितीसाठी |
अण्णां भाऊंनी मांडल्या व्यथा ||
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र |
आंदोलनातील अगग्रण्य व्यक्तीमत्व |
जगविख्यात साहित्यसम्राट |
म्हणजे अण्णा भाऊ ||
अण्णा भाऊंनी फकीरा कांदबरी |
बाबासाहेबांना अर्पण केली |
बाबासाहेबांचा क्रांतिकारी विचार
जग बदल मनामनात कोरला ||
विषमतेवर केला हल्ला |
घटना व्यक्ती चित्रित करून |
मुंबईची लावणी लिहिली |
शब्दांकित केले प्रवासवर्णन ||
मुंबईतील गोरेगावात अण्णा भाऊंचे |
१८ जुलै १९६९ रोजी झाले निधन |
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठेंना |
सुभाष करांनी कोटी कोटी वंदन ||
- सुभाष राघू आढाव
मुंबई



0 टिप्पण्या