काव्यांगी काव्यसंग्रहाचे प्रकाशन थाटात संपन्न
मुंबई : - येथील कवयित्री , लेखिका गीतांजली वाणी यांच्या " काव्यांगी " ह्या अष्टाक्षरी काव्यसंग्रहाचे प्रकाशन नुकतेच अ.भा.मराठी साहित्य संमेलनात सुप्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांच्या हस्ते कुसुमाग्रज नगरी, एम .ई .टी . महाविद्यालय , आडगांव नाशिक, चंद्रकांत महामिने मंच (पुस्तक प्रकाशन मंच) येथे संपन्न झाले. यावेळी डॉ ई वायुनंदन, कुलगुरू यशवंतराव चव्हाण महराष्ट्र मुक्तविद्यापीठ नाशिक , शेफाली समिर भुजबळ , ज्योती उद्योगचे संचालक वसंतराव खैरनार, अखिल भारतीय महाराष्ट्र परिषद पुणे अंतर्गत ठाणे विभाग अध्यक्ष बाळासाहेब तोरस्कर, डॉ. प्रकाश बर्वे, असिस्टंट लायब्ररीयन, यशवंतराव चव्हाण महराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, डाँ. संभाजी पाटील, लायब्ररीयन इंजिनीरिंग कॉलेज, भुजवळ नॉलेज सिटी, श्री विजय राहणे, लायब्ररीयन भुजवळ नॉलेज सिटी, कवयित्री अलका येवले, अध्यक्षा-शब्दशिल्प कलाविष्कार संघ, श्री योगेश वाणी, हे मान्यवर उपस्थित होते.
काव्यांगी काव्य संग्रहाची प्रस्तावना ज्योती उद्योगचे संचालक श्री वसंत खैरनार यांनी लिहिली आहे. जीवनातील सत्य सांगणाऱ्या अनेक घटनांचा मागोवा घेणारा तसेच प्रेम, सेवा, त्याग, राष्ट्रप्रेम, कौटुंबिक नाते जपणूक करणाऱ्या आशयाच्या हृदयाचा ठाव घेणाऱ्या कविता उत्कृष्ट रित्या मांडण्यात कवयित्री यशस्वी झाल्या आहेत. यशस्वी वाटचालीत आणखी एक मानाचा तुरा शिरपेचात रोवला आहे असे कौतुकास्पद शुभेच्छा संदेश कवयित्री अलका येवले आणि श्री विजय राहणे यांनी दिले आहेत. काव्यसंग्रहाचे आकर्षक मुखपृष्ठ श्री शेखर सोनावणे यांनी बनविले आहे.
0 टिप्पण्या